Ad will apear here
Next
‘मोदी सरकारकडून जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण’


मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या केंद्र सरकारने कमीत कमी वेळात जनतेच्या जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण केल्या आहेत,’ असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (ता. २९) मुंबईत केले.

मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारच्या कामाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, भाजप प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, मधू चव्हाण, गणेश हाके, अतुल शाह व कांता नलावडे उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘देशामध्ये नेहरू गांधी घराण्याची राजवट ४० वर्षे होती. त्या काळात झालेले विकासाचे काम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४८ महिन्यांच्या कारकीर्दीत झालेले काम याची तुलना जनतेने जरूर करावी. अशी तुलना केली, तर ध्यानात येईल की, नेहरू गांधी परिवार ४८ वर्षांमध्ये जेवढे काम करू शकला नाही तेवढे काम आम्ही ४८ महिन्यांत केलेले आहे.’

ते म्हणाले की, ‘मोदी सरकारच्या ४८ महिन्यांच्या कालावधीत फार मोठे सामाजिक व आर्थिक परिवर्तन झाले आहे. या सरकारच्या कामामुळे कोट्यवधी सामान्य लोकांच्या आयुष्यात चांगला बदल झाला आहे. मोफत गॅस कनेक्शनची उज्ज्वला योजना, गरिबांची बँक खाती सुरू करण्याची जनधन योजना आणि प्रत्येक कुटुंबाला वैद्यकीय उपचारासाठी दरवर्षी पाच लाख रुपयांचे कवच देणारी सुमारे दहा कोटी कुटुंबांसाठीची आयुष्मान भारत योजना अशी अनेक कामे मोदी सरकारने कोट्यवधी सामान्य लोकांसाठी केलेली आहेत.’

‘महाराष्ट्रातील अपूर्ण सिंचन प्रकल्प, तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त क्षेत्रात आणि दुष्काळी भागात सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे प्रकल्प पूर्ण करून राज्य सरकारच्या साथीने पुढील वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत राज्यातील सिंचनाखालील क्षेत्र सध्याच्या १८ टक्क्यांवरून दुप्पट करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पाणी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे व त्याविषयी सरकार काम करत आहे. या सोबत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीतील मालाच्या आधारे इथेनॉलसारखी उत्पादने निर्माण करणे तसेच ऊर्जानिर्मिती करणे असे उपाय सरकारने हाती घेतले आहेत,’ असे गडकरी यांनी नमूद केले.

गरीब कल्याण, सामाजिक विकास, पायाभूत सुविधा, आर्थिक विकास, जलवाहतूक विकास अशा विविध क्षेत्रात केंद्र सरकारने केलेल्या ठोस कामगिरीची माहिती या प्रसंगी  गडकरी यांनी आकडेवारीसह दिली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZKHBO
Similar Posts
‘नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ‘भाजप’चा विजय संकल्प’ मुंबई : ‘गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत देशाला पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार हवे आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) स्पष्ट बहुमताने पुन्हा केंद्रात सरकार स्थापन करण्याचा विजय संकल्प करून ‘भाजप’चे कार्यकर्ते कामाला लागले आहेत,’ असे प्रतिपादन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईत केले
‘महाराष्ट्राला न्याय देणाऱ्या मोदी सरकारचे आभार’ मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या चार वर्षांत प्रचंड मोठे विकास कार्य केले असून, हे सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदाच महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून न्याय मिळाला असून, राज्याच्या वतीने आपण मोदी सरकारचे आभार मानतो,’
‘चंद्रकांत पाटील यांच्या संघटन कौशल्यामुळे भाजप अधिक मजबूत बनेल’ मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, त्यांच्या संघटन कौशल्यामुळे सरकार व जनतेमधील संघटनेचा सेतू अधिक मजबूत बनेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
‘जनसहभागातून ‘भाजप’चा जाहीरनामा तयार होणार’ मुंबई : ‘भारताचे भविष्य कसे घडावे, हे जनतेच्या सूचनेतून निश्चित होण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) ‘भारत के मन की बात, मोदीजी के साथ’ ही देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. देशभरातील जनतेकडून मिळणाऱ्या सूचनांच्या आधारे ‘भाजप’चा लोकसभा निवडणूक जाहीरनामा तयार होणार आहे. जनभागीदारीतून जाहीरनामा तयार करण्याची

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language